“मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री होणार नाही”, २८८ पैकी १९१ उमेदवार तयार ; महायुतीला थेट चँलेंज

Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Elections : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती तसेच महाविकास आघाडी राज्यात जय्यत तयारी करताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections) भाजपने पहिल्या यादीत 99 उमेदवारांची घोषणा केली आहे. परंतु महायुती तसेच महाविकास आघाडीत अजूनही जागा वाटपाचा फार्म्युला निश्चित झालेला नाही. येत्या दोन ते तीन दिवसात दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाचा फार्म्युला निश्चित होऊन उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आता महायुती मधील मित्रपक्ष असलेल्या ‘राष्ट्रीय समाज पक्षा’च्या नेत्याने एक मोठं आणि धक्कादायक विधान केलंय.

महादेव जानकरांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते ‘महादेव जानकर’ यांनी महायुतीवर गंभीर आरोप केले आहेत. “आम्हाला महायुतीमधील पक्षाने विश्वासात घेतलं नाही, आम्हाला कोणत्याही जागांची चर्चा किंवा बैठकीला बोलावलं”, नसल्याची खंत त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे। यासह महाविकास आघाडीमध्ये देखील सत्तेत जाणार नाही, आमचं काय होईल ? यासाठी आम्ही खंबीर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यासह आता उमेदवार जाहीर केला तर उमेदवार पळून नेतील, असा आरोप करत त्यामुळे आम्ही 288 जागांपैकी 191 उमेदवारांची यादी जाहीर केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

महायुती तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात आक्रमक

महाराष्ट्रात ‘राष्ट्रीय समाज पक्ष’ नक्कीच खातं उघडेल असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला. यासह अजित पवारांची ‘बारामती’ देवेंद्र फडवणीस आणि विरोधात ‘नागपूर’ चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘कामठी’ या ठिकाणी महादेव जानकर प्रचारसभा घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले आहे. महाविकास आघाडीतील पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात देखील कराडमध्ये महादेव जानकर प्रचार सभा घेणार आहेत. यासह ते एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात देखील राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मी आमदार करणारा माणूस

सुरुवातीपासून राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीमध्ये अधिकच्या जागा द्याव्यात, अशी मागणी महादेव जानकर यांनी लावून धरली होती. परंतु महायुतीकडून महादेव जानकर यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही, यावरून मी या निवडणुकीतून (Maharashtra Assembly Elections) कोणालाही सोडणार नाही, काँग्रेस आणि भाजप आम्हाला समान अंतरावर ठेवलेले आहे. दोन्ही पक्ष छोट्या पक्षांना खात आहे. मी आमदार करणारा माणूस आहे, त्यांच्याकडे भीक मागत बसू का ? असं म्हणत त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय. यासह उद्याचं सरकार बनेल, त्यावेळी मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री होणार नाही, असा दावा देखील महादेव जानकर यांनी केलाय.

२३ नोव्हेंबरला लागणार विधानसभेचा निकाल

दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी येत्या 23 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. तर या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 22 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. 29 ऑक्टोबर पर्यंत उमेदवाराला अर्ज सादर करता येणार आहे. चार नोव्हेंबरला उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतो. त्यानंतर राज्यात कोणत्या मतदारसंघात कोणते उमेदवार रिंगणात आहेत ? यावर शिक्कामोर्तब होईल. त्याआधी राज्यात प्रचाराचा जोरदार धुराळा उडणार आहे.

महाविकास आघाडीचा आत्मविश्वास उंचावला

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीवर मोठा विजय मिळवला. राज्यातील 48 मतदार संघापैकी 31 मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आलेत. त्यामुळे साहजिकच विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यात अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा करून महायुतीने राज्यात लोकांच्या बाबत सकारात्मक वातावरण तयार करण्यात यशस्वी झाले आहेत. परंतु या निवडणुकीत नेमका कोणता पक्ष ? सर्वात जास्त आमदार निवडून आणू शकतो आणि कोण मुख्यमंत्री होईल? याची प्रतीक्षा आता राज्यातील सगळ्याच लोकांना लागून राहिली आहे.

महाराष्ट्रातील लाडक्या बहीणींना लवकरच मिळणार तिसरा हप्ता, ‘या’ तारखेला बॅंकेत जमा होणार पैसे

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

Mazi Ladki Bahin Yojana : मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दरमहिन्याला १५०० रूपये जमा होतात. आतापर्यंत महाराष्ट्र सरकारकडून पात्र महिलांच्या खात्यावर दोन टप्प्यात पैसे पाठवण्यात आले आहेत. यातच आता तिसरा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. तिसरा हप्त्यातील पैसे कधी जमा होणार आहेत? याची तारीख आता समोर आली आहे.

हेही वाचा…iphone 16 launch : खूशखबर खूशखबर..! iphone 16 लॉन्च होताच, 15, 14 iphone झाले स्वस्त, ‘इतक्या’ रूपयांची घट 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) तिसऱ्या हप्त्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तिसऱ्या टप्प्यातील पैसे महिलांच्या खात्यावर २९ सप्टेंबर २०२४ रोजी जमा होणार आहेत. राज्य सराकरकडून ही तारीख निश्चित ठरली.  तर यासंदर्भातील मोठा कार्यक्रम रायगड येथे आयोजित केला जाऊ शकतो.

हेही वाचा…कळवणच्या भावी आमदाराने घेतल्या गावकऱ्यांच्या भेटी, दिली ‘ही’ आश्वासने 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. या आधी ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत होती. मात्र सरकारने आता ही तारीख ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवली आहे. आता उरलेल्या महिलांना ३० तारखेपर्यंत योजनेचा अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्यातील महिला या योजनेपासून वंचित राहू नये, म्हणून राज्य सरकारने या योजनेची तारीख आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे दोन हप्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. मात्र या योजनेसाठी पात्र असूनही अनेक महिलांच्या बॅंक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. बॅंक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे महिलांना या योजनेचा अद्याप लाभ मिळू शकलेला नाही. त्यामुळे सर्व महिलांना सुरूवातीला आपला आधार क्रमांक बॅंकेची लिंक करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहेत.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता काय ?

१. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.

२. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.

३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.

४. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.

५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

यामुळे तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज बाद होऊ शकतो ? 

१. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.

२. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.

३. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.

४. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.

५. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.

६. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.

७. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया काय ? 

१. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

२. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.

Read Also : 

हेही वाचा…कळवणच्या भावी आमदाराने घेतल्या गावकऱ्यांच्या भेटी, दिली ‘ही’ आश्वासने 

हेही वाचा…भारत विरुद्ध बांगलादेश : बुमराह अन् सिराजचा मारा बांग्लादेशच्या फलंदाजांना अडचणीत आणणार 

हेही वाचा…निवडणूकीच्या आधीच भाजपमध्ये दोन बडे नेते नाराज, सोमय्यांनी अध्यक्षांना पाठवलं खरमरीत पत्र

हेही वाचा…आदिवासींसाठी कळवण प्रकल्पात विविध योजना मंजूर..! ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत ट

Ramesh Thorat : कळवण-सुरगाणा मतदारसंघात रंगत वाढली, रमेश थोरातांनी ठोकला शड्डू

Ramesh Bhika Thorat

Ramesh Thorat : कळवण : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. अशातच कळवण-सुरगाणा मतदारसंघातून रमेश थोरात यांनी विधानसभा निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. आता आश्वासन नको, बदल हवा, विकासासाठी रमेशदादा थोरात असे म्हणत त्यांनी आपला प्रचार जोरदारपणे सुरू केला आहे. मतदारसंघातील विविध गावांना भेटी देत थोरात यांनी निवडणूकीचं रणशिंग फुंकलं आहे.

रमेश थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणूकीसाठी कळवण-सुरगाणा मतदारसंघातून तयारी सुरू केली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी आवाज उठविणारे खंबिर नेतृत्व शेतकरी, युवक, व्यापारी, कामगार, विद्यार्थी, गोरगरिब यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे, सर्वसामान्य हक्काचा माणूस, आपला माणूस. आपला रमेश दादा असा जोरादर प्रचार सध्या सुरू आहे. यातच नव्या पर्वाची, नवी सुरूवात प्रमाणिकपणे सोबत प्रत्येक संघर्षात. धुरंदर, लढाऊ असंख्य गुणयुक्तव्यक्तिमत्व, जनतेच्या ह्यदयातील आपल्या हक्काचा माणूस असा प्रचारही सोशल मीडियावर सध्या जोरदार सुरू आहे.

यातच गणपती उत्सवाच्या दरम्यान रमेश दादा थोरात सध्या विविध मंडळांना भेटी देत आहेत. कुंडाणे शिरसमणी जिरवाडा या गावात अलिकडेच थोरात यांनी भेट देत महाआरती केली. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केले. तसेच आता आम्हाला तुमच्यासारखं नेतृत्व मिळालं. आता आम्ही तुमच्या पाठीमागे आहे. असे सांगत रमेश थोरात यांनी सर्व गावावातील समस्या जाणून घेतल्या. त्यावर मी येणार आणि तुमच्या समस्या सोडवणार तुम्ही घाबरू नका. आता मी तुमच्यासाठीच तुमची सेवा करण्यासाठी उभा असल्याचे थोरात यांनी गावकऱ्यांना सांगितले.

दरम्यान, तुमची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून मी या मतदारसंघाचे उमेदवारी करत. असून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच तुमच्या समस्या सोडविण्यासाठी येणार आहे. असेही त्यांनी सांगितले. यावेळी सर्व गावातील ग्रामस्थांनी दादांचा सत्कार केला.