Mukhyamantri Annapurna Yojana : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची संपुर्ण माहिती

Mukhyamantri Annapurna Yojana online Apply

प्रस्तावना : Mukhyamantri Annapurna Yojana online Apply : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अनेक महत्वपुर्व योजना सुरू केल्या आहेत. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२३ ते २०२४ या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची घोषणा केली आहे. या याजनेच्या माध्यमातून राज्य सरकार आर्थिक मागास असलेल्या पाच कुटुंबातील सदस्यांना प्रत्येक वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जात आहेत. या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील जनतेला मिळणार आहे. या योजनेचा आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी फायद्याचा आहे. योजनेसाठी अर्ज कसा करायचा, याचा नेमका कुणाला फायदा होतो? तसेच या योजनेची सर्व प्रक्रिया यामधून तुम्हाला देण्यात येत आहे.

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची (Mukhyamantri Annapurna Yojana) सुरूवात महाराष्ट्रात राज्य सरकारकडून २८ जून २०२४ पासून करण्यात आली आहे. या योजनेचा पुर्ण नाव मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना असं आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. केंद्र सरकारने सुरूवात केलेल्या उज्वला योजनेतून प्रेरित होऊन राज्य सरकारने या योजनेसाठी ५२.१६ लाख परिवारांसाठी ही योजना सुरू केली आहे.

या सोबत मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेच्या पात्र महिलांना प्रत्येक वर्ष तीन गॅस सिलेंडर रिफिल मुक्त मिळणार आहे.

योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना
फायदा प्रत्येक वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत
कोणी सुरूवात केली ? महाराष्ट्र सरकार
योजनेची सुरूवात कधी झाली ? महाराष्ट्राच्या २०२४ अंतिम अर्थसंकल्पात
उद्देश गरिब कुटुंबातील महिलांना धुरापासून मुक्तता
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाईन
अधिक माहितीसाठी वेबसाईट  Click here

अन्नपुर्णा योजनेसाठी पात्रता

  • अन्नपुर्णा योजनेसाठी महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय काढण्यात आला आहे. याद्वारे महाराष्ट्रातील पात्र महिलांना याचा फायदा होऊ शकतो.
  • अन्नपुर्णा योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर गॅस कनेक्शन महिलेची नावावर असलं पाहिजे.
  • आतापर्यंत या योजनेसाठी उज्वला योजना, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे. परंतु पुढील काळात सर्वच महिलांना याचा फायदा दिला जाणार आहे.
  • एक राशन कार्डवर एकाच महिलेला याचा फायदा होणार आहे.
  • अन्नपुर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र महिलेला १४.२ किलो गॅस मोफत दिला जाणार आहे.
  • या योजनेसाठी फक्त पाच कुटुंब सदस्य असलेल्यांना फायदा दिला जाणार आहे. एक महिन्यात फक्त एकच गॅस दिला जाणार आहे.

महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • पॅन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • कौटुंबिक ओळखीचा पुरावा
  • गॅस कनेक्शन (आधीपासून असल्यास, किंवा उज्ज्वला योजना खाते)
  • जात प्रमाणपत्र
  • बँक खाते
  • मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा फॉर्म

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेसाठी (Mukhyamantri Annapurna Yojana) अर्ज प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. ज्या महिलांना याआधी उज्वला तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. त्या महिलांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी पात्र महिलांनी खालील प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकतात.

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? 

  • सर्वप्रथम तुम्हाला अन्नपुर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला योजनेसाठी नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणीसाठी नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना नोंदणी फॉर्ममध्ये भरावी लागेल. यामध्ये तुमचं नाव, पत्ता मोबाईल नंबर इत्यादी.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लॉगिन पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर वेबसाईटच्या मेनू पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता मेनूमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी तुमची वैयक्तिक माहिती जसं की महिलेचे नाव, बॅंक खाते तपशील, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर भरावे लागेल.
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अर्जामध्ये माहिती भरल्यानंतर, तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि सबमिट वर क्लिक करावे लागेल.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळवले जाईल.

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करायचा ? 

  • अन्नपुर्णा मुख्यमंत्री योजनेसाठी ऑफलाईन (Mukhyamantri Annapurna Yojana) पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या गॅस कनेक्शन कार्यालयात जावं लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला अन्नपुर्णा योजनेचा फॉर्म घ्यावा लागेल. त्यात महिलेची माहिती भरावी लागेल.
  • तुम्हाला हवे असल्यास दिलेल्या लिंकवरून अन्नपुर्णा योजना फॉर्म PDF डाऊनलोड करू शकता.
  • अन्नपुर्णा योजना फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंडआऊट घ्यावी लागेल. त्यात माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला योजनेशी संबंधित कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील.
  • कागदपत्रे जोडल्यानंतर जवळच्या गॅस कनेक्शन कार्यालयात जाऊन ते जमा करावे लागेल. तिथून पावती घ्यावी लागेल.
  • अशा प्रकारे तुम्ही अन्नपुर्णा योजनासाठी ऑफलाईन अर्ज करू शकता.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची यादी कशी तपासायची ?

  • सर्वप्रथम तुम्हाला अन्नपुर्णा योजनेच्या (Mukhyamantri Annapurna Yojana ) अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ओटीपीने लॉगईन करावे लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला मेन्युवर क्लिक करावे लागेल नंतर अल्पिकेशन तयार केलेल्या पुर्वीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना यादी ओपन होईल. त्यावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकार तुम्ही अन्नपुर्णा योजनेची यादी तपासू शकता.

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना महत्वाच्या लिंक

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा फॉर्म Click here
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा शासन निर्णय Click here
अन्नपुर्णा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज Click here
Join WhatsApp Click here
Join Telegram Click here

महाराष्ट्रातील लाडक्या बहीणींना लवकरच मिळणार तिसरा हप्ता, ‘या’ तारखेला बॅंकेत जमा होणार पैसे

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

Mazi Ladki Bahin Yojana : मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दरमहिन्याला १५०० रूपये जमा होतात. आतापर्यंत महाराष्ट्र सरकारकडून पात्र महिलांच्या खात्यावर दोन टप्प्यात पैसे पाठवण्यात आले आहेत. यातच आता तिसरा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. तिसरा हप्त्यातील पैसे कधी जमा होणार आहेत? याची तारीख आता समोर आली आहे.

हेही वाचा…iphone 16 launch : खूशखबर खूशखबर..! iphone 16 लॉन्च होताच, 15, 14 iphone झाले स्वस्त, ‘इतक्या’ रूपयांची घट 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) तिसऱ्या हप्त्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तिसऱ्या टप्प्यातील पैसे महिलांच्या खात्यावर २९ सप्टेंबर २०२४ रोजी जमा होणार आहेत. राज्य सराकरकडून ही तारीख निश्चित ठरली.  तर यासंदर्भातील मोठा कार्यक्रम रायगड येथे आयोजित केला जाऊ शकतो.

हेही वाचा…कळवणच्या भावी आमदाराने घेतल्या गावकऱ्यांच्या भेटी, दिली ‘ही’ आश्वासने 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. या आधी ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत होती. मात्र सरकारने आता ही तारीख ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवली आहे. आता उरलेल्या महिलांना ३० तारखेपर्यंत योजनेचा अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्यातील महिला या योजनेपासून वंचित राहू नये, म्हणून राज्य सरकारने या योजनेची तारीख आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे दोन हप्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. मात्र या योजनेसाठी पात्र असूनही अनेक महिलांच्या बॅंक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. बॅंक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे महिलांना या योजनेचा अद्याप लाभ मिळू शकलेला नाही. त्यामुळे सर्व महिलांना सुरूवातीला आपला आधार क्रमांक बॅंकेची लिंक करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहेत.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता काय ?

१. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.

२. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.

३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.

४. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.

५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

यामुळे तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज बाद होऊ शकतो ? 

१. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.

२. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.

३. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.

४. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.

५. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.

६. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.

७. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया काय ? 

१. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

२. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.

Read Also : 

हेही वाचा…कळवणच्या भावी आमदाराने घेतल्या गावकऱ्यांच्या भेटी, दिली ‘ही’ आश्वासने 

हेही वाचा…भारत विरुद्ध बांगलादेश : बुमराह अन् सिराजचा मारा बांग्लादेशच्या फलंदाजांना अडचणीत आणणार 

हेही वाचा…निवडणूकीच्या आधीच भाजपमध्ये दोन बडे नेते नाराज, सोमय्यांनी अध्यक्षांना पाठवलं खरमरीत पत्र

हेही वाचा…आदिवासींसाठी कळवण प्रकल्पात विविध योजना मंजूर..! ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत ट

Ramesh Thorat : “आता आश्वासन नको, बदल हवा..! विकासासाठी ‘रमेश’दादा हवा”

Ramesh Thorat

Ramesh Thorat : कळवण : ‘निर्धार विकासाचा, संकल्प विजयाचा’ असे म्हणत रमेश थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणूकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी रमेश थोरात कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. त्यासाठी त्यांनी मतदारसंघात गावोगावी जाऊन लोकांशी संपर्क साधण्याचं काम सुरू केले आहे. यातच आता कळवण- सुरगाणा मतदारसंघासाठी त्यांचा जाहीरनामा सोशल मीडियावर फिरू लागला आहे.

नव्या पर्वाची, नवी सुरूवात, प्रामाणिकपणे सोबत प्रत्येक संघर्षात. धुरंदर, लढाऊ असंख्य गुणयुक्तव्यक्तिमत्व, जनतेच्या ह्यदयातील आपल्या हक्काचा माणूस अशा पद्धतीने रमेश थोरात यांनी मतदारसंघात आपला प्रचार सुरू केला आहे. गणपती उत्सवात देखील रमेश थोरात (Ramesh Thorat) यांनी विविध गावांमध्ये जाऊन गणपती मंडळांना भेटी दिल्या. याच दरम्यान त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून गावातील समस्या, अडचणी जाणून घेतल्या. यातच आता आश्वासन नको, बदल हवा. विकासासाठी रमेशदादा हवा. असे म्हणत जोरदार प्रचार सुरू केला आहे. रमेश थोरात हे सुरगाणा नगरपंचायतचे माजी नगरसेवक आहेत.

धनशक्ती विरुध्द जनशक्ती

आमदार म्हणून निवडून आल्यास कळवण-सुरगाणा मतदारसंघात विकासाची काय कामं करणार ? त्यावर एक जाहिरनामा प्रसिद्ध होत आहे. यामध्ये कळवण शहरापासुन 5 कि.मी. वर असलेले सर्व प्रशासकीय कार्यालय कळवण शहरात आणणार सध्या असलेल्या प्रशासकीय कार्यालयात येथे भव्य मेडिकल कॉलेज उभारणार. पाण्याचे योग्य नियोजन करून मतदार संघातील शेतकरी वर्ग व पिण्याच्या पाण्याचे टंचाई कायमस्वरुपे नियोजन करणार व सिमेंट बंधारे, माती बंधारे तसेच धरणे बांधणार.

मतदार संघातील सर्व ग्रामपंचायतीतील नगरपंचायततील, सा.बां. विभागा अंतर्गत येणारे गावपाड्यावरील सर्व रस्ते करणार व मुलभुत सुविधे अंतर्गत येणाऱ्या योजना राबविणार. सर्व सुविधांनी युक्त हॉस्पिटल्स् ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी एम.डी../ एम.बी.बी.एस व एम.एस असे सर्व तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध करणार. मतदार संघातील गावराण जमिनी वर भव्य असे क्रिडांगण, व्यायामशाळा, वाचनालय, शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी उपलब्ध करून देणार वाढीसाठी जमिन मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार व शेतीसाठी जमिनी (अतिक्रमित) मिळवुन देणार.

निराधार आणि वृध्द लोकांसाठी वाढीव पेन्शन योजनासाठी प्रयत्न करणार जेणे करून निराधार राहणार नाही. (Ramesh Thorat)अंत्योदय रेशन कार्ड तयार करून देणार. लहान व मोठ्या मुलांना खेळण्यासाठी गार्डन आणि सर्व सुविधांनी युक्त असे ग्राऊंड ग्रामीण व शहरी भागात बनविणार. मतदार संघातील सर्व ग्रामपंचायत मार्फत लघु उद्योगांना चालना देऊन गावात रोजगार निर्मिती करण्यास भर देणार व सर्वांना घर देणार व गरजुंना घरकुल योजना राबविणार. महिला बचतगट तसेच पुरुष बचत गट प्रोत्साहान देऊन महिला व पुरुष बचत गटांचे समक्षीकरण करून बिनव्याजी कर्ज देण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार. शेतकऱ्याला विकासाचा बिंदू ठेऊन कृषी विषयक योजना व कृषीला हमीभाव मिळवुन देणार व सर्व शेतीमालाला योग्य भाव मिळवुन देणार.

शेतकऱ्यांच्या विजबिल माफीसाठी प्रत्यत्न करुन 24 तास विज पुरवठा करण्यास मदत करणार. कळवण व सुरगाणा बसस्थानके आधुनिक करणार. व एस.टी. कर्मचारी यांचे प्रश्न (वेळावेळी सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आवाज उठविणार नविन बस उपलब्ध करणार. मतदार संघातील अंगणवाडी सेविका व मदतनिस आशा स्वयंसेविका शिक्षक कर्मचारी, लिपीक, शिपाई तसेच प्रेरक प्रेरिका यांचे प्रश्न विधानसभेत मांडुन न्याय देणार. मतदार संघातील धरणे, तलाव यांच्या कामाला गती देऊन कायमस्वरुपी पाण्याचे दुष्काळी निवारण करणार. मतदार संघातील मंदिरे सुशोभित करणार. मतदार संघातील प्राथमिक, माध्यमिक व शिक्षक प्राध्यापक कृषी सहाय्यक ग्रामसेवक तलाठी, लिपीक, ग्रामविकास बांधकाम महसुल विकास विद्युत कर्मचारी पोलिस पत्रकार डॉक्टर इत्यादी सर्व कर्मचारी अधिकारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवाज उठविणार.

वनजमिनीचे प्रश्न मार्गी लावणार व स्वतंत्र्य 7/12 देणार. सर्व शासकिय योजनेंचे योग्य पध्दतीने अंमलबजावणी करून विकास करणार. मतदार संघातील सर्व ग्रामपचांयत, गट ग्रामपचायंत, जिल्हापरिषद, नगरपंचायत, यांना भरघोस निधी उपलब्ध करून देणार. मतदार संघातील सर्व गावातील जि.प. शाळा सुसज्ज आणि उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून डिजीटल करणार. मतदार संघात आरोग्य विद्यापीठ स्थापन करणार. (Ramesh Thorat)

मतदार संघातील सर्व व्यापारी बांधव यांच्या समस्या सोडविणार व्यवसाय वाढीसाठी शासनाच्या जमिनीवर कमी दरात गाळे उपलब्ध करून देणार. (23) मतदार संघातील ग्रामीण व शहरी भागात क्रांतिकारांचे व समाजसुधारक यांचे स्मारक उभारणार. अभोणा (मध्यवर्ती ठिकाणी), बोरगांव (सापुतारा हायवे), सुरगाणा (मध्यवर्ती ठिकाणी) भव्य असे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणार. भोगवटदार-2 मिळकती भोगवटदार-1 मध्ये रुपांतरीत करणार यात मतदार संघातील मिळकतदार यांना त्या मिळकतीचे फायदे मिळणार. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मतदार संघातील यथाशक्ती योगदान राहिलेले स्वातंत्र्य सेनानी यांचे मतदार संघात मध्यवर्ती ठिकाणी मोठे असे स्मारक उभारणार. असे अनेक आश्वासनं त्यात देण्यात आलं आहे.

Ramesh Thorat : कळवण-सुरगाणा मतदारसंघात रंगत वाढली, रमेश थोरातांनी ठोकला शड्डू

Ramesh Bhika Thorat

Ramesh Thorat : कळवण : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. अशातच कळवण-सुरगाणा मतदारसंघातून रमेश थोरात यांनी विधानसभा निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. आता आश्वासन नको, बदल हवा, विकासासाठी रमेशदादा थोरात असे म्हणत त्यांनी आपला प्रचार जोरदारपणे सुरू केला आहे. मतदारसंघातील विविध गावांना भेटी देत थोरात यांनी निवडणूकीचं रणशिंग फुंकलं आहे.

रमेश थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणूकीसाठी कळवण-सुरगाणा मतदारसंघातून तयारी सुरू केली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी आवाज उठविणारे खंबिर नेतृत्व शेतकरी, युवक, व्यापारी, कामगार, विद्यार्थी, गोरगरिब यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे, सर्वसामान्य हक्काचा माणूस, आपला माणूस. आपला रमेश दादा असा जोरादर प्रचार सध्या सुरू आहे. यातच नव्या पर्वाची, नवी सुरूवात प्रमाणिकपणे सोबत प्रत्येक संघर्षात. धुरंदर, लढाऊ असंख्य गुणयुक्तव्यक्तिमत्व, जनतेच्या ह्यदयातील आपल्या हक्काचा माणूस असा प्रचारही सोशल मीडियावर सध्या जोरदार सुरू आहे.

यातच गणपती उत्सवाच्या दरम्यान रमेश दादा थोरात सध्या विविध मंडळांना भेटी देत आहेत. कुंडाणे शिरसमणी जिरवाडा या गावात अलिकडेच थोरात यांनी भेट देत महाआरती केली. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केले. तसेच आता आम्हाला तुमच्यासारखं नेतृत्व मिळालं. आता आम्ही तुमच्या पाठीमागे आहे. असे सांगत रमेश थोरात यांनी सर्व गावावातील समस्या जाणून घेतल्या. त्यावर मी येणार आणि तुमच्या समस्या सोडवणार तुम्ही घाबरू नका. आता मी तुमच्यासाठीच तुमची सेवा करण्यासाठी उभा असल्याचे थोरात यांनी गावकऱ्यांना सांगितले.

दरम्यान, तुमची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून मी या मतदारसंघाचे उमेदवारी करत. असून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच तुमच्या समस्या सोडविण्यासाठी येणार आहे. असेही त्यांनी सांगितले. यावेळी सर्व गावातील ग्रामस्थांनी दादांचा सत्कार केला.

Narendra Modi : ‘नरेंद्र मोदीं’चा राजकीय प्रवास कसा राहिलाय ?

narendra modi

Narendra Modi : समकालीन भारतातील सर्वात उल्लेखनीय राजकीय कहाण्यांपैकी नरेंद्र नोदी ( Narendra modi ) यांची एक विनम्र काहाणी आहे. दृढ निश्चय, धोरणात्मक विचारसरणी आणि जनतेशी जोडून घेण्याची क्षमता असे त्यांचे जीवन आणि राजकीय कार्यकीर्द राहिलेली आहे. गुजरातमधील एक सामान्य कार्यकर्ता. ते जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे नेतृत्व करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास. अनेक महत्वपूर्ण घटनांनी बांधला गेला आहे. याचमुळे त्यांनी राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर आपली मान्यता मिळवून वेगळी छाप सोडली आहे.

प्रारंभिक जीवन आणि विनम्र सुरुवात

नरेंद्र दामोदर दास मोदी Narendra modi यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातमधील वडनगर या छोट्या गावात झाला. त्यांचे कुटुंब साधे आणि विनम्र होते; त्यांचे वडील एक चहाचा स्टॉल चालवत असत, जिथे लहान नरेंद्र मोदी त्यांच्या वडिलांना मदत करत असत. या प्रारंभिक अनुभवाचा मोदींनी अनेक वेळा उल्लेख केला आहे. ज्यामुळे त्यांना कष्ट आणि चिकाटीचे मूल्य शिकायला मिळाले. अनेक राजकारण्यांच्या विपरीत, जे राजकीय प्रभावी कुटुंबातून येतात, मोदींची पार्श्वभूमी साधी होती आणि सत्तेच्या परिसरापासून खूप दूर होती.

गुजरातमधील वडनगर या छोट्या गावात नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी झाला. त्यांचे साधे अन विनम्र कुटुंब. वडील एक चहाचा स्टॉल चालवत असत. त्याच ठिकाणी नरेंद्र मोदी त्यांच्या वडिलांना मदत करत होते, या प्रारंभिक अनुभवाचा मोदींंनी आपल्या भाषणांतून अनेकदा उल्लेख केला आहे. नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात की, ज्यावेळी वडिलांच्या व्यवसायात मदत करत होतो,  त्यावेळी मला त्यातून कष्ट आणि चिकाटीचे मुल्य शिकायला मिळाले. सहासा भारतात अनेक राजकीय नेत्यांना त्यांच्या घराण्यांचा वारसा लाभलेला आहे.परंतु नरेंद्र मोदी यांचं जीवन याउलट आहे. नरेंद्र मोदी यांचे कुटुंब राजकारणांपासून कोसो दूर होता. परंतु त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर आपलं नेतृत्व सिद्ध करून दाखवलं.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघात (आरएसएस) नरेंद्र मोदी  ( Narendra modi ) यांनी आपली खरी ओळख निर्माण केली. उजव्या विचारसणीचे हिंदू राष्ट्रवादी संघटन ज्यामुळे त्यांच्या राजकीय तत्वज्ञानावर आणि जागतिक स्तरावर आपला दृष्टीकोनावर खोलवर प्रभाव टाकला. अगदी लहानपणापासूनच नरेंद्र मोदी यांनी आरएसएससोबत काम करण्यास सुरूवात केली. संघटनेच्या उपक्रमांमध्ये भाग घेतला आणि संघटनात्मक तंत्र आणि विचारसरणी शिकली. याच वातावरणात मोदींच्या राजकीय कल्पना आणि महत्वाकांक्षा घडल्या. ज्यामुळे त्यांनी मोठ्या राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले.

गुजरातमधील राजकीय उदय

नरेंद्र मोदींची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने १९८० च्या दशकात सुरू झाली. जेव्हा त्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. आरएसएसमधील त्यांच्या संघटन कौशल्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतूक करण्यात आले. मोदींनी पडद्यामागे राहून प्रचाराचे व्यवस्थापन आणि भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी योग्य नियोजन केले. त्यांची राजकीय क्षमता आणि नेतृत्व काही दिवसातच समोर आले. १९९५ पर्यंत त्यांनी गुजरातमध्ये भाजपच्या विचाराचे सरकार स्थापन केले.  परंतु मोदींच्या राजकीय कारकीर्दीला २००१ मध्ये निर्णयक वळण मिळाले. २००१ मध्ये गुजरातमध्ये भुकंपा झाल्यामुळे अस्थिरता निर्माण झाली होती. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल ही परिस्थिती हाताळण्यास अयशस्वी ठरले. त्यावेळी भाजप नेतृत्वाने पटेल यांना पायउतार करून नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री केले. हा निर्णय मोदींच्या भारतीय राजकारणातील उदयाची सुरूवात ठरला.

२००१ narendra modi gujarat prime minister

गुजरात मॉडेलचा विकास

२००१ ते २०१४ पर्यंतच नरेंद्र मोदींचा ( Narendra modi )  गुजरात मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ त्यांच्या राजकीय ओळखीचा केंद्रबिंदू ठरला. त्यांच्या शासकीय धोरणाने जलद औद्योगिकीकरण, पायाभूत सुविधा सुधारणा आणि गुजरामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यावर त्यांनी भर दिला. मोदींनी त्यांच्या दृष्टीकोनाला ‘गुजरात मॉडेल’ असे नाव देण्यात आले. त्यानंतर हा गुजरात मॉडेल राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा ठरला.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातने मोठ्या प्रमाणावर आर्थिक विकास साधला. विशेष:त उत्पादन आणि उर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केली. प्रमुख औद्योगिक कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक केली, त्यात मोदींची उद्योगधार्जिणी भूमिका उद्योग क्षेत्रात प्रशंसनीय ठरली. तरीही टिकाकारांनी दाखवून दिले की हा विकास असमतोल होता, ज्यात कृषी आणि सामाजिक विकासाची पीछेहाट होत होती. परंतु विरोधकांकडून अशी टिका होत असतांनाही विकासाभिमुख नेता म्हणून त्यांची ओळख होत गेली.

२००२ गुजरात दंगली: एक काळी घटना

मोदींच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात वादग्रस्त घटना म्हणजे २००२ सालच्या गुजरात दंगली. गोध्रा रेल्वे जाळल्याच्या घटनेनंतर हिंसाचार सुरू झाला, ज्यामध्ये ५९ हिंदू यात्रेकरू मारले गेले. त्यानंतर, गुजरातभर दंगली उसळल्या, ज्यात एकूण १००० हून अधिक लोकांचा बळी गेला. यामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिमांचा समावेश होता. मोदींच्या सरकारवर हिंसाचार थांबवण्यासाठी पुरेसे प्रयत्न न केल्याचा आरोप करण्यात आला, आणि काहींनी असा आरोप केला की त्यांनी दंगेखोरांना मूकसंमती दिली.

दंगलींमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध झाला. मोदींवर अनेक चौकश्या झाल्या, आणि जरी भारतीय न्यायालयांनी त्यांना दोषमुक्त केले, तरी दंगलींचा सावली अनेक वर्षे त्यांच्यावर राहिली. त्यांच्या टीकाकारांसाठी, दंगलींनी त्यांच्या कारकिर्दीवर डाग लावला, परंतु त्यांच्या समर्थकांचा असा विश्वास आहे की मोदींना अन्यायकारकपणे लक्ष्य करण्यात आले आणि त्यांच्या नंतरच्या कारभारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

2002 gujarat riots

गुजरातमधून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश

२००० च्या दशकाच्या शेवटपर्यंत मोदींचे  ( Narendra modi ) गुजरातमधील यश त्यांना राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आणले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त प्रगतीशील आघाडी (यूपीए) कडून दोन निवडणूक पराभव झाल्यानंतर भाजपच्या स्थितीत घट झाली होती. मोदींची ठोस नेता म्हणून आकर्षण क्षमता आणि यूपीए सरकारमधील भ्रष्टाचार आणि मंद आर्थिक वाढ याबद्दलची असमाधानता यामुळे त्यांना भाजपच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे प्रमुख पद मिळाले.

२०१३ मध्ये, भाजपने औपचारिकपणे २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मोदींना आपला उमेदवार म्हणून घोषित केले. मोदींच्या प्रचारात अत्यंत संघटित आणि तांत्रिक दृष्ट्या प्रगत दृष्टिकोन दिसून आला. त्यांनी गुजरातमधील आपली कामगिरी मांडली आणि राष्ट्रीय पातळीवर “गुजरात मॉडेल” लागू करण्याचे आश्वासन दिले. त्यांचा संदेश विकास, रोजगारनिर्मिती आणि चांगले शासन यावर आधारित होता, जो “अच्छे दिन” या घोषवाक्यातून व्यक्त केला गेला.

मोदींच्या वैयक्तिक करिष्मा, असंतुष्ट मतदार आणि विभाजित विरोधकांमुळे भाजपला २०१४ च्या निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भाजपने २८२ जागा जिंकल्या, ज्यामुळे तीन दशकांनंतर कोणत्याही पक्षाला स्वतंत्रपणे बहुमत मिळाले. नरेंद्र मोदी २६ मे २०१४ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

पंतप्रधानपदाचा कार्यकाळ

मोदींच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे उपक्रम दिसून आले. त्यांचा एक प्रमुख कार्यक्रम “मेक इन इंडिया” होता, ज्याचा उद्देश भारतातील उत्पादन क्षेत्राला चालना देणे होता. त्यांनी “स्वच्छ भारत अभियान” (स्वच्छ भारत मोहीम) देखील सुरू केली, ही स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी देशव्यापी मोहीम होती. आर्थिक समावेशन हा आणखी एक प्राधान्य विषय होता, ज्याचे उदाहरण म्हणजे “जन धन योजना”, ज्याचा उद्देश कोट्यवधी बँक खाते नसलेल्या भारतीयांना बँकिंग सेवेत समाविष्ट करणे होता.

आंतरराष्ट्रीय स्तरावर, मोदींनी भारताच्या संबंधांमध्ये सुधारणा करण्यासाठी काम केले. त्यांनी अनेक राजनैतिक दौरे केले, आणि भारतीय प्रवासी समाजाशी असलेली त्यांची संवाद साधण्याची वृत्ती उल्लेखनीय होती. मोदींनी भारताला जागतिक नेते म्हणून स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला, विशेषत: नवीकरणीय ऊर्जा आणि हवामान बदलाच्या क्षेत्रात.

तथापि, त्यांच्या कार्यकाळात वादग्रस्त निर्णय देखील घेतले गेले, जसे की २०१६ मध्ये उच्च मूल्याच्या चलन नोटांचे विमुद्रीकरण. हा निर्णय काळा पैसा आणि भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी म्हणून मांडला गेला होता, परंतु त्याचा अर्थव्यवस्था आणि लघु व्यवसायांवर झालेला परिणाम मोठ्या प्रमाणात टीकेचा विषय ठरला. आणखी एक महत्त्वपूर्ण धोरण म्हणजे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करणे, ज्याचा उद्देश भारताच्या जटिल कर प्रणालीला सुलभ करणे होता.

narendra modi prime minister of india oath

पुनर्निवड आणि दुसरा कार्यकाळ

२०१९ मध्ये, मोदींना ( Narendra modi )  आणखी मोठ्या बहुमताने पुन्हा निवडून दिले गेले, कारण भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने लोकसभेत ३५३ जागा जिंकल्या. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात काही महत्त्वपूर्ण परंतु वादग्रस्त निर्णय घेतले गेले. ऑगस्ट २०१९ मध्ये, त्यांच्या सरकारने जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केला. या निर्णयाचे काहींनी स्वागत केले, तर काहींनी याचा विरोध केला.

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) हे आणखी वादग्रस्त मुद्दे होते ज्यामुळे देशभरात निदर्शने झाली. टीकाकारांचा असा दावा होता की ही धोरणे मुस्लिमांवर अन्याय करतात, तर सरकारने सांगितले की शेजारील देशांतील अत्याचारित अल्पसंख्याकांचे रक्षण करण्यासाठी हे आवश्यक आहे.

कोविड-१९ महामारी आणि भावी आव्हाने

कोविड-१९ महामारीने मोदी सरकारसमोर अभूतपूर्व आव्हाने निर्माण केली. मार्च २०२० मध्ये झालेल्या सुरुवातीच्या लॉकडाऊनला ठोस पाऊल म्हणून पाहिले गेले, परंतु २०२१ मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेच्या काळातील परिस्थिती हाताळण्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. वैद्यकीय पुरवठा, ऑक्सिजन आणि लस यांची कमतरता यामुळे लोकांचा संताप व्यक्त झाला. या आव्हानांनंतरही मोदी सरकारने लसीकरण मोहीम आणि आर्थिक पुनर्प्राप्ती उपायांसह पुढे जाण्याचा प्रयत्न केला.

नरेंद्र मोदी ( Narendra modi )  त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात आहेत आणि त्यांची राजकीय कहाणी चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या समर्थकांसाठी, ते एक दूरदर्शी नेता आहेत, ज्यांनी भारताचे आर्थिक आणि राजकीय लँडस्केप बदलले आहे. त्यांच्या टीकाकारांसाठी, त्यांच्या कारकिर्दीत विभागणी करणारी धोरणे आणि स्वेच्छाधिकार दिसून येतात. मतभेद असले तरी, नरेंद्र मोदींचा गुजरातमधील चहा विक्रेत्यापासून भारताच्या पंतप्रधानपदापर्यंतचा राजकीय प्रवास हा त्यांच्या निर्धाराचा आणि राजकीय कौशल्याचा पुरावा आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न : 

१) नरेंद्र मोदी यांच्याकडे किती संपत्ती आहे ? 

सलग तीन वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतरही मोदींकडे ना घर आहे ना गाडी आहे. २०१८ आणि २०१९ या काळात त्यांनी आपल्या संपत्तीत ५२ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. यानुसार त्यांच्याकडे २८ लाख इतकी संपत्ती आहे. तर स्टेट बॅंक ऑफ इंडिय बॅंकच्या खात्यात नरेंद्र मोदी यांच्याकडे १.२७ कोटी रूपयांच्या मुदत ठेवीच्या स्वरूपात आहे. त्यामुळे मोदींची एकूण संपत्ती ३ कोटी २ लाख६ हजार ८८९ इतकी आहे.

२ )नरेंद्र मोदी यांच्याकडे किती रोख रक्कम आहे. ?

31 मार्च २०२४ पर्यंत त्यांच्याकडे २४ हजार ९२० रूपये कॅश स्वरूपात आहे. त्याचवेळी १३ मे रोजी त्यांनी बॅकेतून २८ हजार रूपये काढले आहेत. हे सर्व पकडून एकूण ५२ हजार ९२० रूपये रोख रक्कम आहे. तर ३१ मार्च २०१९ पर्यंत त्यांच्याकडे ३८ हजार ७५० रूपये रोख आणि ४ हजार १४३ रूपये बॅंकेत ठेवी होत्या.

३ ) नरेंद्र मोदी यांचं वय किती आहे. ? 

नरेंद्र दामोदर दास मोदी Narendra modi यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातमधील वडनगर या छोट्या गावात झाला.  १७ सप्टेंबर २०२४ साली नरेंद्र मोदी यांनी आपला ७४ वा वाढदिवस साजरा केला.

४ ) नरेंद्र मोदी यांचं कुटुंब ? 

नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचं नाव दामोदरदास मुलचंद मोदी आहेत. त्यांच्या आईचं नाव हिराबेन मोदी असून त्यांचं नुकतंच निधन झालं आहे. २०२३ साली हिराबेन यांनी आपले १०० वर्ष पुर्ण केले होते.  तर नरेंद्र मोदी यांना चार भाऊ आहेत. सोमाभाई मोदी, अमृतभाई मोदी, प्रल्हाद मोदी, पंकद मोदी असे चार भाऊ नरेंद्र मोदी यांना आहेत. नरेंद्र मोदी यांचा १९६८ साली जशोदाबेन यांच्याशी विवाह झाला. परंतु काही वर्षांपुर्वी ते विभक्त झालेत.

मटणावर ताव मारायचा मग ही पाहा..!पुण्यातील सर्वात १० बेस्ट नानव्हेज हॉटेलस्

Top 10 non veg restaurants in Pune

Top 10 non veg restaurants in Pune : पुण्यात आलात. मग पुण्यात येऊन झणझणीत मटणावर ताव मारल्याशिवाय जाणार कसं ? मटण, चिकन, मासे, अंडाकरी असे पदार्थ खाणाऱ्या खवय्यांसाठी आज आपण पुण्यातील सर्वोत्तम दहा मांसाहारी हॉटेलची यादी तयार केली आहे. पुण्यात कोणत्याही भागात असाल तरी ही यादी तुमच्या चवीचे गोडवे पुरवल्याशिवाय राहणार नाहीत. या हॉटेलमधील चव चाखल्यावर तुमचं पुन्हा पुन्हा मन याच हॉटेलकडे येणार हे नक्की आहे. काही लोकांमधून आपण काही हॉटेलची यादी तयार केली आहे.

१)  हॉटेल ‘साईनाथ’ ( Hotel ‘Sainath’)

पुण्यातील  ( Top 10 non veg restaurants in Pune)  सर्वात बेस्ट नान व्हेज हॉटेल पैकी साईनाथ खानावळ एक आहे. चिकन, मटण, कोल्हापूरी आणि मालवणी पदार्थ असणारी ‘साईनाथ हॉटेल’ काही दिवसात खवय्यांच्या पसंतीत उतरली आहे. पुण्यातील अल्का चौक, कुमठेकर रस्त्याची सुरूवात, पोलिस चौकी समोरही हॉटेल आहे. चिकन थाळी, मटन थाळी, एकदम स्वस्त आणि मस्त मिळतेय. रविवारी तसेच शनिवार या हॉटेलमध्ये प्रचंड गर्दी असते. खाण्यासाठी लोक अर्धा-ते पाऊण तास वाट पाहून आपली भूक भागवातात. मी स्वत: या हॉटेलमध्ये चार ते पाच वेळा जाऊन आलो आहे. याठिकाणी भाकरी आणि सुक्कं चिकन एकदम खास आहे.

Hotel 'Sainath

२ ) ‘हॉटेल नागपूर’ (‘Hotel Nagpur’)

तिखट आणि मसालेदार पदार्थांच्या चाहत्यांसाठी ‘हॉटेल नागपूर’, बेस्ट आहे. या हॉटेलमध्ये नागपूरी मटण, मसालेदार चिकन, तिखट मिसळ याचसोबत आणखी झणझणीत पदार्थ तुम्हाला मिळू शकतात. आपण गुगल मॅपवर जर हॉटेल नागपूर अंनास फाटा, १९९, सागर बेकरी जवळ असं टाकल्यास तुम्हाला या हॉटेलचा पत्ता अगदी सहज मिळू शकतो. नाही तर पुण्यातील कुणालाही विचारल्यास या हॉटेलचा पत्ता अगदी कुणीही सांगू शकेल.

३) हॉटेल ‘आवारे’ (Hotel ‘Aware’)

हॉटेल आवारे मध्ये आल्यास तुम्हाला शाकाहारी तसेच मांसाहारी असे दोन्ही पदार्थ खायाला मिळू शकतात. सदाशिव पेठेतील ही एक खानावण मटण, चिकनसाठी फेमस आहे. चिकन हंडी, चिकन मसाला थाळी, मटण मसाला थाळी, आळणी मटणकरी थाळी, आळणी मटण थाळी याठिकाणी फेमस आहे. कोल्हापूर पद्धतीने बनविण्यात येणारा तांबडा, पांढरा रस्ता थाळीसोबत दिला जातो. ५०० रूपयांमध्ये याठिकाणी दोघांचा मटण-चिकन खाऊन होतं. या हॉटेलमध्ये २५० रूपयाला थाळी मिळते.

पत्ता:  १५३४, पहिला मजला, अशोकप्लाझा, गरवारे कॉलेजजवळ, कर्वे रोड, पुणे, महाराष्ट्र 411004,

Top 10 Best Non Veg Hotels in Pune
Top 10 Best Non Veg Hotels in Pune

४) हॉटेल मिलन (Milan Hotel)

हॉटेल मिलन  ( Top 10 non veg restaurants in Pune) लोकांची पसंतीत उतरल्याने मिलनच्या अनेक शाखा पुण्यात सुरू झाल्या आहेत. मिलनमध्ये गेल्यास आपल्या आत्मा अतृप्त होतो. याठिकाणी मटण थाळी, चिकन थाळी, सुरमई थाळी, मिलन स्पेशन मटन, चिकन थाळी, मटण चिकण हंडी मिळते. तुम्हाला याठिकाणी भाकरी, चपाती जव्वार, बाजारा, तंदूर रोटी मिळते.विशेष म्हणजे एक व्यक्ती एक थाळी ही अनलिमिटेड खाऊ शकतो. सदाशिव पेठ तसेच पुण्यातील विविध भागात हॉटेल मिलन च्या शाखा आहेत.

पत्ता: १०५६/५७, आपटे रोड, डेक्कन जिमखान्याजवळ, पुणे, महाराष्ट्र

वेळ: दुपारचे जेवण: 12:00 PM – 3:00 PM

रात्रीचे जेवण: 7:00 PM – 11:00 PM

Top 10 Best Non Veg Hotels in Pune
Top 10 Best Non Veg Hotels in Pune

५) हॉटेल स्वराज्य (Hotel Swarajya)

आपल्या परिवारासाठी चिकन-मटण खायचं असेल तर तुम्हाला हॉटेल स्वराज्य सर्वोत्तम हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये तुम्हाला २८० पासून पुढे चविष्ट, स्वादिष्ट थाळी मिळतेय. मटण थाळीमध्ये तुम्हाला फ्राईड मटण पासून ते मटणाच्या रस्सा आणि स्वादिष्ट मटण बिर्याणीसह सात प्रकारच्या थाळ्या आहेत. तुम्ही जर सोलापूरचे असाल तर तुम्हाला या हॉटेलमध्ये सोलापूरच्या मटणाची चव आल्याशिवाय राहणार नाही. मी स्वत : अनेकदा या हॉटेलमध्ये गेलो आहे. मन तृप्त झाल्याशिवाय राहत नाही.

पत्ता: १८३, शिवाजी नगर, शिवाजी नगर बस डेपोजवळ, पुणे, महाराष्ट्र 411005

वेळ: दुपारचे जेवण: 12:00 PM – 3:00 PM

      रात्रीचे जेवण: 7:00 PM – 11:00 PM

Top 10 Best Non Veg Hotels in Pune
Top 10 Best Non Veg Hotels in Pune

६) हॉटेल ‘फिश करी राइस’ (Hotel ‘Fish Curry Rice’)

समुद्रातील सर्व पदार्थ आणि विशेष करून कोकणी जेवण तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही बिनधास्त ‘फिश करी राईस’ या हॉटेलमध्ये या. ताजे मासे, फिश थाळी, कोळंबी करी आणि मालवणी शैलीचे मासे या हॉटेलमध्ये मिळतात. सिगनेचर थाळीत तुम्हाला फिश थाळीमध्ये भांगडा, बोंबील, मुदसे, पॉम्पेट, प्रान्स, सुरमई, रवस इत्याही मासे तुम्हाला एकाच थाळीत खायला मिळतात. Pomfret ThalI, Sumai Thali. Prawns Thali, Bangda Thali अशा थाळ्या तुम्हाला या हॉटेलमध्ये मिळतात.

पत्ता :  २, श्री सिद्धिविनायक अपार्टमेंट, कोथरूड डेपोजवळ, कोथरूड, पुणे, महाराष्ट्र 411038,

वेळ: दुपारचे जेवण: 12:00 PM – 3:00 PM

रात्रीचे जेवण: 7:00 PM – 11:00 PM

७) सुरवेस पिऊर नॉन व्हेज (Surves Pure Non Veg)

पुण्यातील एप सी रोडवर असलेल्या या हॉटेलमध्ये तुम्हाला मटण खिमा चपाती, मटन फ्राय, मटण आळणी फ्राय, मटण उकड, मटण भजी, मटन रोस्ट, मटन सुक्का फ्राय, असे विविध मटणाचे प्रकार एकाच ठिकाणी मिळतात. यासह मटन करी, मटन दालचा खाना, स्पेशल मटन थाळी, अशा विविध थाळ्या तुम्हाला एकाच ठिकाणी मिळू शकतात.

पत्ता : १, अशोकप्लाझा, १६४, सदाशिव पेठ, मिठीबाई कॉलेजजवळ, पुणे, महाराष्ट्र ४११०३०, भारत

वेळ : दुपारचे जेवण: 12:00 PM – 3:30 PM

       रात्रीचे जेवण: 7:00 PM – 11:00 PM

Top 10 non veg restaurants in Pune

८) हॉटेल मराठा सम्राट (Hotel Maratha Samrat)

( Top 10 non veg restaurants in Pune) काळं चिकन, चिकन थाळी, मटन थाळी, सी फूट थाळी, अंडा थाळी अशा विविध थाळ्या तुम्हाला अगदी कमी दरात हॉटेल मराठा सम्राट हॉटेलमध्ये मिळतात. हॉटेल शिव सागर पुण्यातील एक लोकप्रिय हॉटेलपैकी हॉटेल शिव सागर आहे. विशेषत उत्तम भारतीय आणि मांसाहारी खाद्यपदार्थासाठी ओळखते जाते. हॉटेल शिवसागरमध्ये आपल्याला विविध प्रकारचे पारंपारिक आणि स्वादिष्ट पदार्थ मिळतात. विशेष करून पंजाबी, मुघलाई, कोल्हापूरी, तंदूरी चिकन, मटण करी अशा थाळ्या याठिकाणी मिळतात.

पत्ता : 660, दुसरा मजला, शंकर शेठ रोड, कमला नेहरू पार्क समोर, पुणे, महाराष्ट्र 411037

वेळ : दुपारचे जेवण: 12:00 PM – 3:00 PM

        रात्रीचे जेवण: 7:00 PM – 11:00 PM

Top 10 non veg restaurants in Pune

९) हॉटेल संदीप (Hotel Sandeep)

अहमदनगर येथील हॉटेल संदीप हे उकडलेलं सुक्क मटण आणि काळ्या मसाल्यात बनविण्यात येणाऱ्या मटनामुळे प्रसिद्ध आहे. संदीप हॉटेलच्या मेन्यूवरील चिकन उकड, चिकन हंडी, चिकन फ्राय, चिकन रोस्ट, मटण हंडी, मटण उकड, मटण फ्राय हे पदार्थ फेमस आहे. येथे २५० पासून थाळी मिळते.

पत्ता : १७/१, बाजीराव रोड, शनिवारवाड्यासमोर, पुणे, महाराष्ट्र ४११०३०

वेळ: दुपारचे जेवण: 11:00 AM – 3:00 PM

        रात्रीचे जेवण: 7:00 PM – 11:00 PM

Top 10 Best Non Veg Hotels in Pune

१०) हॉटेल जगदंबा (शिवापूर): (Hotel Jagdamba (Shivapur)

पुण्याचे सर्वात आवडते चिकन थाळीचे ठिकाण दुसरे तिसरे कोणी नसून हॉटेल जगदंबा आहे. जरी हे ठिकाण पुण्याच्या हद्दीत असले तरी लोक शिवापूरला त्यांची सर्वात स्वादिष्ट चिकन थाळी घेण्यासाठी जातात जे पूर्ण करण्यापेक्षा जास्त आहे कारण त्यांच्या अमर्यादित चिकन थाळीमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की काय खावे आणि काय नाही याबद्दल संभ्रम निर्माण होतो. कोणीही कुटुंब आणि शाकाहारी लोकांसह या ठिकाणी भेट देऊ शकता, कारण त्यांच्याकडे शाकाहारी मेनू देखील आहे.

पत्ता : शॉप 3, पुणे बंगलोर हायवे, खेड, शिवापूर

वेळ : दररोज: दुपारी 12:00 ते 4:30

                     संध्याकाळी 7:00 ते 12:00

Umarkhed Constituency : ‘उमरखेड मतदारसंघ’ : तरूणाई पुन्हा वळाली कॉंग्रेसकडे, ५०० पेक्षा अधिक तरूणांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

Vidhan sabha election v

prasad lad with Kirit Somaiya

Umarkhed Constituency : उमरखेड : कॉंग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणावर, नेतृत्वावर आणि विचारावर विश्वास ठेवत उमरखेड तालुक्यातील बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खरबी, दराटी, २०१४ आणि २०१९ साली मतदारसंघातील तरूणांनी भाजपच्या आमदारांना निवडून दिले. परंतु दोन्ही आमदार तरूणांच्या हाताला काम आणि बेरोजगारीचा टक्का कमी करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. दहा वर्षांपासून हा Umarkhed Assembly Constituency : मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला आहे. परंतु विद्यमान आमदाराने फक्त जवळच्याच कार्यकर्त्यांचा विकास केल्याचे बोललं जात आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे तत्कालीन आमदारसोबत त्यांची सावली म्हणून राहणाऱ्या पांढऱ्या बगळ्याने मोठ्या प्रमाणात मायापुंजी जमा केल्याचीही चर्चा आहे. यामुळेच मतदारसंघातील तरूण भाजपवर नाराज होऊन तरूणांनी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे.

उमरखेड मतदारसंघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला

मागील काही दिवसांपूर्वी फुलसावंगी येथील भाजप समर्थकांनी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. अशातच मतदारसंघातील तरूणांनी भाजपच्या विरोधात खदखद तसेच पांढऱ्या बगळ्याने भ्रष्टाचारात घेतलेल्या गगनभरारीचा परीणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा आगामी विधानसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर मतदारसंघात कॉंग्रेस पक्षात मोठी मरगळ आल्याचे दिसून आले. परंतु मतदारसंघात कॉंग्रेसला पुन्हा जिवंत करण्यात साहेबराव कांबळे यांनी काम केले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या मोठ्या फौजा तयार केल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून तातू भाऊ देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर, दत्तारावजी शिंदे, गोपाल भाऊ अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली साहेबराव कांबळे यांनी मेहनत घेतली आहे. त्याचाच परिणाम म्हणून तरूणाई कॉंग्रेसकडे ओढली जात आहे. यामुळे मतदारसंघाला नव संजीवनी मिळाली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

तरूणाई कॉंग्रेसकडे ओढली

मागील काही दिवसांपूर्वी फुलसावंगी येथील भाजप समर्थकांनी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. अशातच मतदारसंघातील तरूणांनी भाजपच्या विरोधात खदखद तसेच पांढऱ्या बगळ्याने भ्रष्टाचारात घेतलेल्या गगनभरारीचा परीणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा आगामी विधानसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर मतदारसंघात कॉंग्रेस पक्षात मोठी मरगळ आल्याचे दिसून आले. परंतु मतदारसंघात कॉंग्रेसला पुन्हा जिवंत करण्यात साहेबराव कांबळे यांनी काम केले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या मोठ्या फौजा तयार केल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून तातू भाऊ देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर, दत्तारावजी शिंदे, गोपाल भाऊ अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली साहेबराव कांबळे यांनी मेहनत घेतली आहे. त्याचाच परिणाम म्हणून तरूणाई कॉंग्रेसकडे ओढली जात आहे. यामुळे मतदारसंघाला नव संजीवनी मिळाली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी फुलसावंगी येथील भाजप समर्थकांनी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. अशातच  Umarkhed Assembly Constituency : मतदारसंघातील तरूणांनी भाजपच्या विरोधात खदखद तसेच पांढऱ्या बगळ्याने भ्रष्टाचारात घेतलेल्या गगनभरारीचा परीणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा आगामी विधानसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर मतदारसंघात कॉंग्रेस पक्षात मोठी मरगळ आल्याचे दिसून आले. परंतु मतदारसंघात कॉंग्रेसला पुन्हा जिवंत करण्यात साहेबराव कांबळे यांनी काम केले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या मोठ्या फौजा तयार केल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून तातू भाऊ देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर, दत्तारावजी शिंदे, गोपाल भाऊ अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली साहेबराव कांबळे यांनी मेहनत घेतली आहे. त्याचाच परिणाम म्हणून तरूणाई कॉंग्रेसकडे ओढली जात आहे. यामुळे मतदारसंघाला नव संजीवनी मिळाली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

भाजप समर्थकांचा कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय

मागील काही दिवसांपूर्वी फुलसावंगी येथील भाजप समर्थकांनी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. अशातच मतदारसंघातील तरूणांनी भाजपच्या विरोधात खदखद तसेच पांढऱ्या बगळ्याने भ्रष्टाचारात घेतलेल्या गगनभरारीचा परीणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा आगामी विधानसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर मतदारसंघात कॉंग्रेस पक्षात मोठी मरगळ आल्याचे दिसून आले. परंतु मतदारसंघात कॉंग्रेसला पुन्हा जिवंत करण्यात साहेबराव कांबळे यांनी काम केले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या मोठ्या फौजा तयार केल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून तातू भाऊ देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर, दत्तारावजी शिंदे, गोपाल भाऊ अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली साहेबराव कांबळे यांनी मेहनत घेतली आहे. त्याचाच परिणाम म्हणून तरूणाई कॉंग्रेसकडे ओढली जात आहे. यामुळे मतदारसंघाला नव संजीवनी मिळाली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी फुलसावंगी येथील भाजप समर्थकांनी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. अशातच Umarkhed Assembly Constituency : मतदारसंघातील तरूणांनी भाजपच्या विरोधात खदखद तसेच पांढऱ्या बगळ्याने भ्रष्टाचारात घेतलेल्या गगनभरारीचा परीणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा आगामी विधानसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर मतदारसंघात कॉंग्रेस पक्षात मोठी मरगळ आल्याचे दिसून आले. परंतु मतदारसंघात कॉंग्रेसला पुन्हा जिवंत करण्यात साहेबराव कांबळे यांनी काम केले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या मोठ्या फौजा तयार केल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून तातू भाऊ देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर, दत्तारावजी शिंदे, गोपाल भाऊ अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली साहेबराव कांबळे यांनी मेहनत घेतली आहे. त्याचाच परिणाम म्हणून तरूणाई कॉंग्रेसकडे ओढली जात आहे. यामुळे मतदारसंघाला नव संजीवनी मिळाली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

आदिवासींसाठी कळवण प्रकल्पात विविध योजना मंजूर..! ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत

government schemes

government schemes :  कळवण प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण जि. नाशिक यांचे कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या कळवण, सुरगाणा, सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड व नांदगाव या तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरीता, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी इच्छूक लाभार्थ्यांकडुन विविध योजनांचे मंजूर अर्ज (government schemes) मागविण्यात आले आहेत.  कळवण प्रकल्प कार्यक्षेत्रातील न्युक्लिअस बजेट योजने अंतर्गत मंजुर असलेल्या योजनांचे अनुसूचित जमातीचे लाभार्थ्यांची निवड करण्याकामी अर्ज मागविण्यात येत आहेत.

ज्या अनुसूचित जमातीच्या इच्छूक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ (government schemes ) देण्यासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजने अंतर्गत खालील गट अ (उत्पन्न निर्मितीच्या किंवा उत्पन्न वाढीच्या योजना)  व गट क ( (मानव साधन संपत्ती विकासाच्या व आदिवासी कल्याणात्मक योजना) गटातील खालील योजनांसाठी दिनांक १३ सप्टेंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ च्या आत  ( सुट्टीचे दिवस वगळून ) प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण जि. नाशिक येथे अर्ज सादर करावेत.  सदर योजनांचा अर्ज एकात्मिक आदिवासी प्रकल्प कळवण व कार्यक्षेत्रातील तहसिल कळवण, सुरगाणा, सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड व नांदगाव गट विकास अधिकारी पंचायत समिती येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (government schemes)

खाली मंजूर योजनांची यादी दिली आहे.

गट अ (उत्पन्न निर्मितीच्या किंवा उत्पन्न वाढीच्या योजना) 

१) अनुसूचित जमातीच्या ग्रामिण भागातील MSRLM व माविम मान्यता प्राप्त आदिवासी समूह बचत गटांस विविध व्यवसाय करण्यासाठी 85% अनुदानावर अर्थसहाय्य करणे

२) अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 85% अनुदानावर प्लॅस्टीक ताडपत्री, कॅरेट, सोपंप खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे

३)  अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना आटा चक्की (घरघंटी) खरेदी करण्यासाठी 85% अनुदानावर अर्थसहाय्य करणे

४) अनुसूचित जमातीच्या महिला/पुरुषांना रसवंती व्यवसाय करण्यासाठी 85% अनुदानावर साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे, अथवा पुरवठा करणे

५) अनुसूचित जमातीच्या दिव्यांग युवक-युवतींना विविध व्यवसाय करणेसाठी 85% अर्थसहाय्य करणे

६) अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना कातकरी व पारवी जमातीच्या कुटूंबाना विविध व्यवसायासाठी अर्थसहाय्य करणे

७) अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना व MSRLM मान्यता प्राप्त आदिवासी समूह बचत गटांस शेतात कीटक नियंत्रण करीता पीक संरक्षण यंत्र सौर स्वंयचलित प्रकाश सापळे खरेदी कामी 85% अनुदानावर अर्थसहाय्य करणे

८) प्रकल्प कार्यालय कार्यक्षेत्रातील सुरगाणा तालुक्यातील JL.G (संयुक्त दायित्व गट) गटांना मिल्क कलेक्शन सेंटर मध्ये संगणक, प्रिंटर, दुद्याची डिग्री/फॅट तपासणी युनिट खरेदीसाठी 85% अनुदानावर अर्थसहाय्य करणे

९) अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना कावेरी कोंबडी कुकूट पालन उद्योग करण्याकामी 85% अनुदानावर अर्थसहाय्य करणे

१०) अनुसूचित जमातीच्या ग्रामिण भागातील MSRLM व मान्यता प्राप्त आदिवासी समूह बचत गटांस खेकडा पालनासाठी 85% अनुदानावर अर्थसहाय्य करणे

११)  अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 85% अनुदानावर मासेमारी करण्यासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करणे

गट क (मानव साधन संपत्ती विकासाच्या योजना व आदिवासी कल्याणात्मक योजना)

१ ) अनुसूचित जमातीच्या अपघातग्रस्त / नुकसाग्रस्त कुटूंबांच्या जवळ-च्या नातेवाईकांना अर्थसहाय्य करणे.

२) अनुसूचित जमातीच्या बचत गटास बँन्डसंच पुरवठा करणे. आदिवासी ग्रामपंचायतींना सार्वजनिक कार्यक्रमाकरीता भांडी संच पुरवठा करणे.

अटी व शर्ती :-

१) लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा,

२) जातीचा दाखला,

३) आधार कार्ड,

४) रेशन कार्ड,

५) लाभार्थ्यांचे राष्ट्रियकृत बैंक खाते पासबूक झेरॉक्स,

६) उत्पन्नाचा दाखला/दारीद्र्य रेषेचा दाखला (अलिकडील १ वर्षाच्या आतील)

७) अपंग, विधवा, परितक्त्या प्रमाणपत्र (असल्यास),

८) मतदान कार्ड किंवा पॅनकार्ड

९) अलीकडील काळातील २ पासपोर्ट आकाराचे सुस्पष्ट फोटो

१०) आवश्यकतेनुसार 7/12 खाते उतारा व नमुना 8 चा उतारा

११) ग्रामसभेचा ठराव

१२) बचत गट असल्यास नोंदणी प्रमाणपत्र

या पूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र इ. आवश्यक कागदपत्र जोडावेत. तसेच अपूर्ण असलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज भरुन देण्यांची अंतिम मुदत ही दि.३० सप्टेंबर २०२४, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

प्रकल्प कार्यालयाकडून काही सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे

1) या कार्यालयात यापूर्वी सादर केलेला पात्र अपात्र अर्ज प्रतिक्षाधीन अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

2) अर्जदाराने एखाद्या योजने करीता अर्ज केला म्हणजे तो त्या योजनेस पात्र झाला असे नाही.

3) अर्ज करतांना योजनेचे पूर्ण नाव टाकणे आवश्यक आहे, तसेच कागदपत्र परीपुर्ण असल्या शिवाय लाभ देय राहणार नाही.

4) लाभार्थ्यांची निवड करतांना प्रथम अपंग, विधवा, परितक्त्या, महिला, यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

कोकण रेल्वेत १९० जागांची भरती, फी फक्त ५९ रूपये, आताच करा अर्ज

Job alert

Job alert : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळे आपल्या व्हायरल महाराष्ट्र या वेबसाईटवरून नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजुंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे (Job alert) नोकरीची गरज असलेले तरूण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करू शकतील. सध्या कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यास सुरूवात झाली आहे. याची सुरूवात येत्या यासाठी अर्ज करण्याची सुरूवात ही १६ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची तारीख ०६ ऑक्टोंबर २०२४  आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि नोकरीची संधी (Job alert) मिळवा.

जाहिरात क्रमांक : CO/P-R/01/2024

एकूण जागा : 190 जागा

पदाचे नाव :

१ ) सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil)

२) सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical)

३) स्टेशन मास्टर

४) कमर्शियल सुपरवाइजर

५) गुड्स ट्रेन मॅनेजर

६) टेक्निशियन III (Mechanical)

७) टेक्निशियन III (Electrical)

८)ESTM-III (S&T)

९)असिस्टंट लोको पायलट

१०) पॉइंट्स मन

११)ट्रॅक मेंटेनर-IV

शैक्षणिक पात्रता : 

पद क्र.१: इंजिनिअरिंग पदवी (Civil)

पद क्र.२: इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical / Electronics)

पद क्र.३: कोणत्याही शाखेतील पदवी

पद क्र.४: कोणत्याही शाखेतील पदवी

पद क्र.५: कोणत्याही शाखेतील पदवी

पद क्र.६: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter / Mechanic Diesel / Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles) /Mechanic Automobile (Advanced Diesel Engine) / Mechanic (Motor Vehicle)/ Tractor Mechanic /Welder / Painter)

पद क्र.७: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/Wireman/Mechanic )

पद क्र.८: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician / Electronics Mechanic / Wireman) किंवा 12वी उत्तीर्ण (Physics & Maths)

पद क्र.९: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Armature and Coil Winder / Electrician / Electronics Mechanic / Fitter /Heat Engine / Instrument Mechanic / Machinist / Mechanic Diesel / Mechanic (Motor Vehicle) / Millwright Maintenance Mechanic / Mechanic Radio & TV / Refrigeration and Air-conditioning Mechanic / Tractor Mechanic / Turner / Wireman) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile)

पद क्र.१०: 10वी उत्तीर्ण

पद क्र.११ : 10वी उत्तीर्ण

 

वयाची अट  : ०१ ऑगस्ट २०२४ रोजी १८ ते ३६ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

 

नोकरीचे ठिकाण : कोकण रेल्वे

 

Fee : ५९ रूपये.

 

Online अर्ज करण्याची सुरूवात : १६ सप्टेंबर २०२४

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ ऑक्टोबर २०२४

 

जाहिरातसाठी येथे क्लिक करा.

Online अर्जासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा